कल्पकता, निर्भीडपणा आणि मनाचा निर्मळपणा या जणू बालवयातील भगवंतांनी दिलेल्या देणग्या असतात. थोरा मोठ्यांनीही अचंबीत व्हावं, असं कार्य ही लहान मुल करतात. अशा वेळी केवळ त्यांच्याशी पूरक अशी योजना वडीलधाऱ्या मंडळींनी करायची असते.
आणि त्यातही याच बालवयात जर सामाजिक जीवनाची जोड दिली तर निश्चितच सामूहिक सामाजीक भविष्य उज्वल होतं.
आणि ह्याच गोष्टीचा अनुभव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असताना,
वसमत शहरातील सिद्धेश्वर सायं शाखेच्या रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या संपर्काच्या निमित्ताने आला.
२००१ सालची गोष्ट आहे. रक्षाबंधनाच्या संपर्कासाठी सिद्धेश्वर सायं शाखेची बैठक झाली. शासकीय रुग्णालय आणि त्याच परिसरातील व्यापारी वर्ग व त्याला लागूनच असलेले पोलीस स्टेशन येथे संपर्कला जायचे, असे बैठकीत ठरले.
त्यानुसार दोन-दोन स्वयंसेवकांची रचनाही झाली. आणि असे आम्ही सगळेजण संपर्काला निघालो.
मी सरकारी रुग्णालयातील रुग्णांना राख्या बांधण्यासाठी गेलो. बाजारपेठेत काही स्वयंसेवक गेले. आणि दोन स्वयंसेवक पोलीस स्टेशन मध्ये गेले.
त्यात अजिंक्य शशिकांत देशपांडे हा इयत्ता सहावी शिकणारा एक बाल स्वयंसेवक होता. माझ्या दृष्टीने मुख्य पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना राखी बांधली म्हणजे आपला संपर्क झाला, असे मला वाटत होते .
पण प्रत्यक्ष अजिंक्य राख्या बांधून आला, तो सोबत वेगळाच अनुभव घेऊन.
सगळेजणं अनुभव सांगण्यासाठी जेव्हा जमलो तेव्हा अजिंक्य म्हणाला, "सगळ्या पोलिसांना राखी बांधली, पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना देखील राखी बांधली. आणि बाहेर येत असताना शेजारच्या कोठडीत 'चोर' बसलेला होता, त्याला देखील राखी बांधली."
भिती, संकोच हे तर अर्थात नव्हतेच.
पण 'सर्वस्पर्शी', 'सर्वव्यापी' संघकार्य अशाच प्रकारच्या संपर्काने होईल, याची शब्दशः अनुभूती आली.
( संदर्भ व संपर्क सूत्र – श्री अजिंक्य शशिकांत देशपांडे (९४०३१९६९६४), वंदे मातरम् प्रभात शाखेचा स्वयंसेवक, डॉ.हेडगेवार नगर, संभाजीनगर शहर जिल्हा )
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
Just because of you...forever my inspiration
ReplyDeleteThank You So Much!!
मन:पूर्वक धन्यवाद
Delete